विद्यापीठातील विविध समस्या बाबत अभाविपचे विद्यापीठ प्रशासनाला निवेदन

लातूर, २२ फेब्रुवारी २०२४ : आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर महानगराच्या वतीने विद्यापीठातील विविध समस्यांबाबत अभाविपकडून विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिले आहे.

लातूर शहरातील विविध महाविद्यालयाच्या प्राचार्या मार्फत तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र पेठ येथील संचालक प्रा. राजेश शिंदे यांच्यामार्फत कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. यामध्ये विद्यार्थी परिषदेने प्रामुख्याने तीन मागण्या केल्या आहेत.

सध्या मराठवाड्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने चालू सत्राचे परीक्षा शुल्क व आगामी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे शैक्षणिक शुल्क माफ करावे. ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनचे फॉर्म भरले आहेत अशा विद्यार्थ्याचे निकाल येत्या १५ दिवसाच्या आत लावावे. पुनर्मूल्यांकनामध्ये ज्या विद्यार्थ्याचे गुणांमध्ये बदल झाला अशा विद्यार्थ्याचे पुनर्मूल्यांकनाचे शुल्क परत करण्यात यावे. अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

यावेळी अभाविप महानगरमंत्री सुशांत एकोर्गे असे म्हणाले कि, विद्यापीठाचे निकाल वेळेवर लागले नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पुनर्मूल्यांकन व फेरपरीक्षा याचे फॉर्म एकदाच भरून घेतले जात आहेत पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेवर लावून मगच फेरपरीक्षा घेण्यात यावी व विद्यार्थ्याची आर्थिक लूट विद्यापीठाने करू नये. असे त्यांनी सांगितले असून मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्याच्या तीव्र रोषास सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी पश्चिम नगर मंत्री सागर वाडीकर, सहमंत्री तेजुमई राऊत, अभिजित बोरोळे, चैतन्य चेलकर, नागेश पाटील, प्रवीण शिंदे, राम जाधव, अक्षय स्वामी व इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सुधाकर नाईक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा