मुंबई, दि.१७ मे २०२०: सध्या लॉक डाऊन असल्याने अनेकांनी गावाकडे गावाकडचा रस्ता धरला आहे. अनेक लोक रस्त्याने पायी प्रवास करत आहे तर काही वाहनांमधून यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढत चाललले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कळंबोली इथे आज दुपारच्या सुमारास अपघात झाला आहे.
या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले आहे.
कर्नाटक येथून आलेल्या खाजगी बसने बंद पडलेल्या बसला मागून जोरदार धडक दिली. यात ९ लोक प्रवास करत होते.
शनिवारी( दि.१६) रोजी उत्तर प्रदेशमध्ये एक ट्रकमधून आपल्या घरी निघालेल्या मजूरांवर रस्त्यातच काळाने घाला घातला होता.
दोन ट्रकच्या भीषण अपघातात मिहौली राष्ट्रीय महामार्गावरून जाणा-या २५मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर १५ हून अधिक मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
त्यातच हा अपघात झाल्याने अपघातांची मालिकाच सुरू असल्याचे बोलले जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: