अखेर उत्तरसभा गाजली आणि गाजवली ….

मुंबई १२ एप्रिल २०२२ : ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तरसभा घेणार आणि त्यात ते काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर ही सभा सुरु झाली आणि राज ठाकरेंनी आपली तोंडाची तोफ सुरु केली .

राज्यात भोंग्यांना बंद करण्यासाठी ३ मे पर्यंतची मुदत आहे. मुस्लींमानी घरात प्रार्थना करा. धर्म रस्त्यावर आणू नका. प्रामाणिक मुसलमानांनाची कदर करा. सणवार समजू शकतो. पण हनुमान चालीसा हा एक बाण आहे. इतर भात्यातले बाण काढायला लावू नका म्हणत एक इशारा दिला .
यात संजय राऊत यांनी केलेल्या शिवीगाळ पासून ते सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली.

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर देशात जातीयवाद सुरु झाला. याला केवळ शरद पवार हेच कारणीभूत असल्याचं राज ठाकरेंनी ठासून सांगितल. शरद पवार स्वतः नास्तिक असल्याने त्यांचा मंदिरात असलेला फोटो क्वचित मिळेल असं नमूद केलं. शरद पवार कायम फुले ,आंबेडकर ,शाहू यांच्या नावाने भाषण सुरु करतात .पण कधीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कधीच सुरुवात करत नाही. कारण इतर मत फूटू नये हीच त्यांची खेळी आहे.
आजचे पत्रकार संपादक झाले. शिव्या शाप देऊन केवळ मत मिळवतां येत नाहीत. तसेच ईडीच्या नोटीसीमुळे केवळ यांना त्रास होतोय.

जर मला ईडीची नोटीस आली तर मी जेलमध्ये जाईन म्हणत संजय राऊतांना घसघशीत टोला हाणला. राऊत सेनेचे की राष्ट्रवादीचे हेच कळत नाही म्हणत त्यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले.

पाकिस्तानी कलावंत नको म्हणत पहिले पाऊल मनसेने उचलले होते, म्हणत त्यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली. मनसेची ही सभा इतर पक्षांना आव्हान देणारी आणि अस्तित्वाचे उत्तर देणारी ठरली. ही उत्तरसभा महापालिका निवडणूक आणि आगामी २०२४ च्या निवडणूकीत काय जादू घडवेल, हे पाहणं औत्युक्याचं ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा