पवारांमुळे मिळाला होता अमित शहा यांना जामीन, शिवसेनेचा गौप्यस्फोट

मुंबई, ११ सप्टेंबर २०२२ : मुंबई दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला आज शिवसेनेने मुखपत्र सामनातील रोखठोक भूमिकेतून सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रातले यूपीए सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले आहेत.या दरम्यान मोदी व पवारांतील भेठी मुळे अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. असा गौप्यस्फोट शिवसेनेने मुखपत्र सामनातून केला आहे.

शिवसेनेने सामनातून गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. अमित शहा हे वारंवार शिवसेनेच्या बाबतीत ही अशी भाषा वापरतात. हा त्यांच्या मनातील महाराष्ट्राविषयीचा द्वेष आहे. खरं तर त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी सदैव कृतज्ञ राहायला पाहिजे. केंद्रातले यूपीए सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. हा गौप्यस्फोट नसून एक सत्य आहे.

तसेच आणखी एका प्रकरणात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सरकार पद्धतीने भूमिका करून अमित शहा यांना त्या काळात मदत होईल अशी व्यवस्था केली होती. असा खुलासा देखिल शिवसेनेने सामनातून केला आहे. तसेच दोन्ही प्रसंगावर स्वतंत्र लिखाण फक्त संजय राऊतच करू शकतील. असे देखील सामनात सांगण्यात आले आहे. या प्रकरणावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलू शकतील, पण त्याच ठाकरे-पवारांविरुद्ध टोकाचे मिशन आज अमित शहा व त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते चालवत आहेत. राजकारणात व लोकशाहीत मतभेदांना जागा आहे. निवडणुकीच्या माध्यमांतून जिंकणे पराभव करणे तसेच टिका करणे हे चुकीचे नाही, पण भाजपाला शिवसेना फुटल्याबद्दल आनंद गगनात मावत नाही. शिंदे गटास बेकायदेशीरपणे सत्तेवर बसवून त्यांनी ईप्सित साध्य केले. त्यांचे हास्य बिकट आहे. उद्धव ठाकरे व शिवसेनेस गाडण्याची भाषा महाराष्ट्रविरोधी आहे.

बाळासाहेब ठाकरेंशी व त्यांच्या विचारांशी बेइमानी आहे. अमित शहा मुंबईत येऊन अशा विषाची पेरणी करतात व भाजपमधील ‘मराठे’ त्यावर टाळय़ा वाजवतात. पण भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होण्याची शक्यता नाही.

न्यूज प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा