आगामी निवडणुकीपूर्वी दलित आदिवासींच्या अत्याचारात वाढ होणार, प्रकाश आंबेडकर

मुंबई, ५ ऑगस्ट २०२३ : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ येतील तसे देशातील दलित आणि आदिवासी यांच्या विरोधातील अत्याचारात तसेच ओबीसी, मुस्लिम आणि महिला यांच्यावरील हिंसाचारात लक्षणीय वाढ होईल, अशी भीती व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुढील संकटाकडे लक्ष वेधले आहे.

मणिपूर येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांपूर्वी देशातील संभाव्य संकटाबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापारातील सगळ्यात मोठ्या ठेकेदारांच्या प्ले बुक मधून लिंचिग, द्वेषयुक्त भाषणे, सोशल मीडियाद्वारे चुकीचे माहिती पसवरणे, दंगली आदी अनेक गोष्टी निवडल्या जातील आणि भाजप-आरएसएसच्या गुंडांच्या मार्फत ते राबवले जाईल, असे थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

आगामी भारतीय प्रजासत्ताक दिन हा निवडणूकीतल्या फायद्यासाठी भयभीत प्रजासत्ताक मध्ये रुपांतरीत करण्याची भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची योजना आहे, असे सांगतानाच यादरम्यान काँग्रेस तटस्थ भूमिका घेईल आणि मोहब्बत की दुकांन चे तुणतुणे वाजवत राहील, असा टोलाही आंबेडकर यांनी काँग्रेसला लगावला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा