गोल पोस्ट राष्ट्रीय अखेर अयोध्या खटला बंद; १८पुनर्विचार याचिका फेटाळल्या

अखेर अयोध्या खटला बंद; १८पुनर्विचार याचिका फेटाळल्या

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी देण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या १८ पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे अखेर अयोध्या खटला बंद झाला आहे.
अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असल्याचे सांगतानाच सर्वोच्च न्यायलयाने सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद उभारण्यासाठी ५ एकर जागा दिली होती.
कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पक्षकारांकडून ९ आणि इतरांकडून ९ अशा १८ पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
या सर्व याचिकांचा गुणवत्तेच्या आधारे विचार करून त्या फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version