बॅडमिंटनपटू अश्मिताला सुवर्णपदक

नवी दिल्ली: भारताच्या महिला बॅडमिंटनपटूंनी काठमांडू येथे सुरु असलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत वर्चस्व सिद्ध केले आहे.
भारताच्या अश्मिता छलिहाने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्याच गायत्री गोपिचंदवर २१-१८, २५-३३ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले तर गायत्रीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
याआधी अश्मिता छलिहाने उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेच्या ‘अचिनी रत्नासिराचा’ २१-०५, २१-०७ असा पराभव केला होता.
गायत्री गोपीचंदने श्रीलंकेच्याच ‘की ही दिलमी डियास’ हिचा २१-१७, २१-१४ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा