गोल पोस्ट राजकारण बजाज यांची अमित शहांवर टीका

बजाज यांची अमित शहांवर टीका

दिल्ली: “यू पी ए च्या काळात सरकारला टीका करण्याचं स्वातंत्र्य होतं. सध्या मात्र सरकारला टीका सहन होत नाही. लोक सरकारला प्रश्न का विचारू शकत नाहीत?” असा सवाल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांना केला. उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका करताना हे सरकार भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण करत असल्याचं म्हटलं आहे. बजाज यांनी अमित शाह यांना खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेंबद्दल केलेल्या विधानासंबंधीही प्रश्न विचारला. “गोडसे दहशतवादी होता, यामध्ये कोणतीही शंका आहे का?” असं राहुल बजाज यांनी म्हटलं.
बजाज यांच्या टीकेला उत्तर देताना शाह यांनी म्हटलं, की कोणी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये. पक्षानं प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे, असं स्पष्ट केलं.

error: Content is protected !!
Exit mobile version