बलात्कार… समाजव्यवस्थेला लागलेली किड

पुणे, ४ सप्टेंबर २०२०: आजच्या युगातील स्त्रीला, मुलीला समाजात नेहमीच एक वेगळे स्थान दिले गेले आहे. त्यांना भारतासारख्या देशात तर देवीचाच दर्जा देण्यात आला. तरी देखील आजच्या या आधुनिक भारतात समाजातील विकृतीने सारखाच घाला घातला आहे. आजही या समाजात पुरुषी विकृतीचा चेहरा हा ठिकठिकाणी दडून बसला आसतो. जो समजातील पुढे जाणाऱ्या मुलींवर एकदा झडप घालून त्यांचे आयुष खराब करतो. 

देशातील उत्तरप्रदेश राज्यातील लखीमपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. ३ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. त्या चिमुरडीच्या मृतदेह उसात रक्तबंबाळ आवस्थेत आढळला. ऐवढेच नाही तर अत्याचारानंतर नराधमांनी मुलीचा गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलींच्या डोक्यावर देखील वार केल्याच्या खुणा आहेत, असे सांगण्यात आले.

महाराष्ट्रात छातीवर अगरबत्तीचे चटके देत केला बलात्कार

पिंपरी चिंचवडमधे लग्नाचं अमिष दाखवून २५ वर्षीय तरुणीवर छातीवर चटके देत बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकड पोलिसांनी या प्रकरणात राजेश पवार या नराधमला अटक केली आहे. अनेक दिवसांपासून तरुण तरुणीच्या मागे होता, त्यानंतर त्याने तिला तिचे अश्लील फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणी त्याला भेटायला गेली असता तिच्यावर तरुणाने असे अमानुष कृत्य केल्याचे तरुणीने सांगितले.
     

राज्यात कोरोनाच्या या काळात देखील मुलींवर आत्याचारच्या घटना या कमी न होता वाढताना दिसत आहे. राज्यातीलच नव्हे तर देशात देखील हिच परिस्थिती चालू आहे. रोज देशातील कुठल्यातरी कोपऱ्यात निर्भयावर या समाजातील विकृती भक्षकांची  नजर पडतेच आणि नंतर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडते. अशा या घटना होताना समोरील मुलीचे वय देखील हे आजचे नराधम लक्षात ठेवत नाहीत.
     

या होणाऱ्या सर्व घटनांवर देखील भारतीय प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज आहे. भारतात दर दिवसाला मुलीवर, महिलेवर बलात्काराच्या, आत्याचाराच्या घटना घडत असून देशाला फक्त निर्भया प्रकरणातच जाग आल्याचे पहायला मिळते. त्यानंतर देखील आसिफा, कोपर्डी, हैद्रबादसारखे प्रकरणे समोर आलीच पण या घटना कमी न होता वाढतानाच दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा