भाजपा सोडणार नाही: पंकजा मुंडे

मुंबई: फेसबूक पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. पंकजा १२ डिसेंबरला कोणता राजकीय भूकंप करतात, काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. “आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे… आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय.  पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.”  पंकजा मुंडे यांच्या फेकबूक पोस्टमधील या ओळींमुळे त्या भाजपाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे १२ तारखेला भगवानगडावर पंकजा मुंडे काय भूमिका घेतात हे सर्वांच्या उत्सुकतेचा कारण ठरल होत.
परंतु पंकजा मुंडेंनी याला नकार दिला आहे. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपण भाजप सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. भाजपशी एकनिष्ठ असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ” या पोस्ट मुळे जी माझ्याविषयी चर्चा चालू आहे त्याचे मला अतिशय दुःख आहे आणि व्यथित आहे. उलट माझ्यावर असा आरोप केला जातोय की मी कुठल्या पदासाठी असे करत आहे का. मला असं वाटतं की मला कुठल पद मिळू नये म्हणून असा प्रयत्न ची आहे का. असे त्या म्हणाल्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा