गोल पोस्ट इतर सरकारी योजना उज्ज्वला लाभार्थ्यांना मोदी सरकारची मोठी घोषणा

उज्ज्वला लाभार्थ्यांना मोदी सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली, ८ जुलै २०२० : कोरोनाच्या महामरीच्या काळात केंद्र सरकारने अनेक उपाय योजना आणि नवी धोरणे आमंलात आणून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेे.आशातच मोदी सरकारने उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी एक नवीन उपयुक्त घोषणा केली आहे.

कॅबिनेट आणि सीसीईए बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने ३ प्रस्तावनेला मान्यता दिली आहे. कृषी पायाभूत सुविधा विकासासाठी १ लाख कोटी रुपयांच्या एग्री इन्फ्रा फंडाला मान्यता देण्यात अली आहे.

गरीब कल्याण अन्न योजनेलाही नोव्हेंबर पर्यंत मंजुरी मिळाली आहे. तसेच व्यापारी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी २४ टक्के ईपीफ मदतीला मान्यता दिली आहे. त्याच प्रमाणे उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी सिलेंडर योजनेच्या विस्ताराला सुद्धा मान्यता दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version