कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांच्या मृत्यूचे कारण अखेर समोर

मध्य प्रदेश, २५ एप्रिल २०२३: भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये एकाच महिन्यात दोन चित्त्यांचा मृत्यू झाला.प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार हृदयक्रिया बंद पडणे हे मृत्यूचे कारण होते. अधिक माहिती मिळाल्यास हे अजून स्पष्ट होईल. कुनो राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांनी डाउन टू अर्थला, उदय नावाचा चित्ता, मृत्यूपूर्वी चालण्यासाठी धडपडत होता,असे सांगितले

दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या १२ मोठ्या मांजरींपैकी हा एक होती. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये भारताने ७० वर्षांनंतर चित्ता पुन्हा आणला.याआधी देशात अधिकृतपणे नामशेष घोषित करण्यात आले.२७ मार्च रोजी, पहिल्या तुकडीचा भाग असलेली एक मादी चित्ता मृत्यूमुखी पडली.नामिबियातून आणलेल्या संशयित मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला होता. भारतात चित्त्यांच्या येण्याने चर्चांना उधाण आलं. या चित्त्यांमध्ये पाच नर आणि तीन मादी येथे स्थानांतरीत करण्यात आले

धामधुमीत गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी बारा चित्ते भारतात आणण्यात आले होते, त्यांना जंगलात सोडण्यापूर्वी कुनो येथील उद्यानात नियंत्रित अलग ठेवण्याच्या क्षेत्रात ठेवण्यात आले होते. वन अधिकारी आणि डॉक्टरांचे पथक त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.२९ मार्च रोजी चार चित्त्याच्या पिल्लांचे देशाने स्वागत केले. त्यांचा जन्म गेल्या सप्टेंबरमध्ये नामिबियाहून आलेल्या एका मादीच्या पोटी झाला होता.

भारताचे पर्यावरण मंत्री, भूपेंद्र यादव यांनी ही बातमी जाहीर केली होती आणि ही “लक्षणीय घटना” असल्याचे म्हटले होते. भारतामध्ये चित्त्यांचे मोठे प्रतीकात्मक मूल्य आहे कारण ते अनेक लोककथांचा भाग आहेत परंतु स्वातंत्र्यानंतर नामशेष झालेला हा एकमेव मोठा सस्तन प्राणी आहे. शिकार, कमी होत जाणारे अधिवास आणि पुरेशी शिकार नसणे या कारणांमुळे ही जमात नामशेष होत आहे.वन्यजीव तज्ञांनी भारतात या प्राण्याच्या पुन: परिचयाचे स्वागत केले आहे परंतु काहींनी त्यांना इतर भक्षकांपासून संभाव्य धोके आणि पुरेशी शिकार नसल्याचा इशाराही दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा