चंद्रावर जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा

चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हटली कि आपसूकच ‘राकेश शर्मा’ यांचे नाव डोळ्यांसमोर येते. राकेश शर्मा यांनी हा मान मिळवला आहे. चांद्रयान मोहीम त्यांच्यामुळे त्यावेळी यशस्वी करण्यामागे त्यांचा मोठा सहभाग होता. अशा अवलीयला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा….!

पंजाबमधील लुधियाना येथे राकेश शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९४९ रोजी झाला. त्यांनी आपले शिक्षण हैद्राबाद येथून पूर्ण केले. राष्ट्रीय सुरक्षा अॅकॅडमीमधून पास झाल्यानंतर भारतीय वायू दलामध्ये टेस्ट पायलट पदावर ते रुजू झाले. राकेश यांनी पाकिस्तान विरोधातील युद्धामध्ये महत्वाची भूमिका बजावली.

सन १९८२ मध्ये इस्रो आणि सोव्हिएत इंटर कॉसमॉसस्पेस प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अवकाश मोहिमेमध्ये राकेश यांची निवड करण्यात आली.
Soyuz T-११ मोहिमे अंतर्गत राकेश शर्मा २ एप्रिल १९८४ या दिवशी अवकाशयानामधून Salyut ७ स्पेस स्टेशनच्या दिशेने झेपावले. राकेश हे २१ तास ४० मिनिटात अंतराळात वावरले. बायो मेडिसिन आणि रिमोट सेन्सिंगमधील शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे हा राकेश यांचा मोहिमेतील अभ्यासविषय होता.
रशियाचे अधिकारी आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून या अंतराळवीरांनी टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता.
यावेळी इंदिरा गांधी यांनी ‘अंतराळातून आपला भारत कसा दिसतो?’ असे राकेश यांना विचारले. यावर राकेश यांनी ‘सारे जहॉं से अच्छा!’, असे उत्तर देत अवघ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.
या मोहिमेवरून परतल्यावर राकेश शर्मा यांना सोव्हिएत युनियनचे हिरो म्हणून सन्मानित केले तर भारत सरकारने देखील ‘अशोकचक्र’ देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा