चारचाकी कालव्यात कोसळून दोघांचा मृत्यू

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमालाजवळ असणाऱ्या चासकमान कालव्यामध्ये चारचाकी कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. लखन भानुदास रासकर (२६) बापु बाळु रासकर (३५) अशी मृतांची नावे आहेत.
हे दोघेही अण्णापूर येथील रहिवासी होते. ही घटना मंगळवारी(दि.१४) रात्री साडेसातच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्रीच्या सुमारास शिक्रापूर – मलठण रस्त्याने चाललेली चारचाकी नियंत्रण सुटल्याने चासकमान कालव्यात कोसळली.
या अपघातात लखन रासकर आणि बापू रासकर हे दोघे ठार झाले. दोघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे. एकाच कुटुंबातील दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अपघात कशामुळे घडला याचा तपास सुरू आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा