मुंबईत येताय…! मग कोरोना नकारात्मक अहवाल सोबत असणं गरजेचं

मुंबई, २४ नोव्हेंबर २०२०: राज्यात मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढविला आहे. महानगरपालिकेनं जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा येथून हवाई उड्डाणानंतर मुंबईत येणार्‍या लोकांना कोरोनाचा नकारात्मक अहवाल दर्शवावा लागंल. दुसरीकडं, कोरोनासंदर्भात राज्यात नियम शिथिल केले जात आहेत आणि टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन उघडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्वीटद्वारे देण्यात आली आहे.

सणासुदीनंतर आता कोरोनाची प्रकरणं देशातील बर्‍याच भागात वाढत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात प्रवासाच्या नियमांबाबत कडकपणा वाढला आहे. नवीन नियम २५ नोव्हेंबरपासून लागू होतील. नियमानुसार प्रवाश्यांनी आपला नकारात्मक अहवाल चढण्यापूर्वी सादर करणं आवश्यक आहे. यानंतर मुंबईत पोहचलेल्या कर्मचार्‍यांनाही त्यांचा नकारात्मक अहवाल दाखवावा लागंल.

नियमांनुसार, प्रवाशांना महाराष्ट्रात येण्यापूर्वी ७२ तासांपूर्वी कोरोना तपासणी करावी लागंल. जर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा येथून येणाऱ्या लोकांचा कोरोना अहवाल नकारात्मक नसंल तर विमानतळावर आरटीपीसीआर चाचणीसाठी त्यांना पैसे द्यावे लागतील आणि त्यांची चाचणी केली जाईल. चाचणीनंतरच त्यांना घरी जाऊ दिलं जाईल. जर कोणताही अहवाल सकारात्मक आला तर नियमांनुसार कार्यपद्धतीचं अनुसरण करण्यास सांगितलं जाईल.

दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा येथे येणार्‍या किंवा येथून महाराष्ट्रात जाणाऱ्या ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाश्यांसाठीही नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात पोहोचण्यापूर्वी या प्रवाशांनी कोरोना तपासणीचा अहवाल ९६ तासात मिळाला पाहिजे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा