गोल पोस्ट राजकारण काँग्रेसचे जेष्ठ नेते आता मोदी सरकारच्या प्रेमात.

काँग्रेसचे जेष्ठ नेते आता मोदी सरकारच्या प्रेमात.

लखनऊ : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी मंगळवारी आयुष्मान भारत योजनेच्या बहाण्याने मोदी सरकारचे कौतुक केले. लखनौमध्ये वित्त आयोगाच्या बैठकीत ते म्हणाले की, ‘ही चांगली योजना आहे, यास सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे’. यापूर्वी अन्य चार काँग्रेस चेहर्‍यांनी पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या सरकारच्या कारभाराचे एका बहाण्याने कौतुक केले आहे. त्यातील बहुतेक मनमोहन सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिले आहेत.

काँग्रेस चे नेते व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी गेल्या ऑगस्टमध्ये एका टिवटमध्ये पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते, असे म्हटले होते की, “मी सहा वर्षांपासून विनवणी करीत आहे की नरेंद्र मोदी काही चांगले करतात किंवा योग्य गोष्टी बोलतात तर त्यांचे कौतुक केले पाहिजे जेणेकरून जेव्हा ते कुठे चुकले आणि आम्ही त्यांच्यावर टीका करतो तेव्हा त्याच्याकडे विश्वासार्हता असते. ”

त्याचबरोबर थरूर यांच्याआधी आणखी एक माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांच्या कडूनही कौतुक झाले आहे. यापूर्वी त्यांनी असेही म्हटले आहे की, “२०१४ ते २०१९ दरम्यान मोदींनी केलेली कामे समजून घेण्याची वेळ आमच्यावर आली आहे, यामुळे मतदारांच्या ३० टक्केपेक्षा जास्त मतांनी ते सत्तेवर परत आले.”

त्याचबरोबर कॉंग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना सदैव वाईट म्हणण्यावर टीका केले आहे. ते म्हणाले होते की कामांचे मुल्यांकन वैयक्तिक आधारावर न करता मुद्द्यांच्या आधारे केले पाहिजे. त्याचवेळी ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० काढून टाकले गेले होते, तेव्हा कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही मोदी सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version