सायरस मिस्त्री पुन्हा टाटा समूहाचे अध्यक्ष?

नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांची तीन वर्षांपूर्वी टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु राष्ट्रीय कंपनी लवादाने त्यांची हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सायरस मिस्त्रींचा पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

राष्ट्रीय कंपनी लवादाने (एनसीएलएटी) या प्रकरणी आज सुनावणी करताना सायरस मिस्त्रींना मोठा दिलासा दिला आहे. सायरस मिस्त्रींनी टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर याचिका दाखल केली होती. एलसीएलएटीच्या दोन सदस्यीय पीठाने आज (बुधवार) सायरस मिस्त्रींची हकालपट्टी बेकायदेशीर ठरविली आहे. तसेच त्यांनी टाटा समुहाला आपली भूमिका मांडण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे.
न्यायमूर्ती एस. जे. मुखोपाध्याय हे या पीठाचे अध्यक्ष आहेत.
टाटा उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदावरुन अचानक हकालपट्टी करण्यात आल्याचा निर्णय कठोर असून त्यामुळे अत्यंत मोठा धक्का बसल्याचे सायरस मिस्त्री यांनी एका पत्राच्या माध्यमामधून म्हटले होते. कॉर्पोरेट विश्‍वात या घडामोडीमुळे खळबळ उडाली होती. टाटा सन्समध्ये मिस्त्री कुटुंबामध्ये 18.4 टक्के शेअर आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा