जन्मदात्या वडिलांना मृत्यूनंतर मुलींनी दिला अग्नी, समाजासाठी दिला वेगळा संदेश

चोपडा, जळगाव २४ नोव्हेंबर २०२३ : आजच्या आधुनिक युगात मुलांबरोबर मुलींना देखील तेवढेच मानाचे स्थान आहे. सर्वच क्षेत्रात मुली देखील आम्ही कुठे मागे नाही, असा संदेश देताना दिसत असतात. जुन्या लोकांची एक म्हण आहे “मुला पेक्षा मुलगी बरी” या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव आज चोपडा तालुक्यातील चुंचाळे गावात पहायला मिळाला.

सविस्तर वृत असे की, चोपडा तालुक्यातील चुंचाळे गावातील प्रगतशील शेतकरी विठ्ठल तुकाराम पाटील यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली या आहेत. आपल्या वडिलांच्या अंत्य संस्कार प्रसंगी चोपडा येथील सुरेखा कमलाकर भामरे, लहान हातेड येथील जागृती भुषण बाविस्कर या दोन्ही बहिणींनी आपल्या वडिलांच्या अंत यात्रेत पार्थिवाला खांदा देऊन आपले कर्तव्य पार पाडले. या दोघी बहिणींनी चक्क स्मशानभूमीत जावून आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी दिला. त्यांच्या या गोष्टीचे समाजात सर्वत्र कौतुक केले जात आहे. आपल्याला जरी मुलगा नसला तरी मुलाचे कर्तव्य मुली देखील पार करु शकतात. असा संदेश त्यांनी समाजासाठी दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : आत्माराम पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा