दुकाने पूर्णवेळ सुरू राहण्याबाबत लवकरच निर्णय: छगन भुजबळ

नाशिक, दि.५ जून २०२०: नाशिक जिल्हा कोरोनाच्या संकटातून बाहेर येत असून जनजीवन देखील हळूहळू पूर्वपदावर येत आहे. राज्यातील रूग्णसंख्या परिस्थिती नियंत्रणात येत आहे. शासनाने वेळोवेळी लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्याने उद्योग, कारखाने, दुकाने सुरू करण्यात आली आहेत. दुकानांची वेळ वाढविण्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी भुजबळ म्हणाले की, जिल्हयात कोरोनाच्या आजारामुळे ३ रूग्ण व्हेटींलेटरवर आहेत. यावरून जिल्हयातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे सौम्य लक्षणे असलेली १६ रूग्ण आहेत. ३८० करोनाबाधित रूग्ण हे रूग्णालयांत उपचार घेत आहेत. वेळोवेळी केलेल्या उपाययोजनांमुळे आता नाशिक शहर आणि जिल्हयात परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योगधंदे सुरू झाले आहेत. या उद्योगांमध्ये कामगारही कामावर परतले आहेत. मालेगांवमध्ये सुरूवातीला उद्योग सुरू करण्यात काही अडचणी होत्या. परंतु आता मालेगावमधील यंत्रमाग सुरू करण्यात आले आहे. आता बाजारपेठांमधील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु दुकानांसाठी वेळेचे निर्बंध आहेत. मात्र आता दुकानांची वेळ वाढवण्याबाबत आम्ही विचार करत असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या बैठकीत खरिप हंगामाबाबत आढावा घेण्यात आला. पीककर्ज वाटप, बियाणांची उपलब्धता व पुरवठयाबाबत नियोजन, खतांची उपलब्धता व पुरवठा याबाबत नियोजन, सिंचनासाठी पाणी आरक्षणाचे नियोजन याचा यावेळी आढावा घेण्यात आला.

या बैठकीप्रसंगी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदि उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा