दिल्ली अग्नीतांडव : मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत

नवी दिल्ली: दिल्लीतील कारखान्याला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत दिल्ली सरकारने जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये व त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे जाहीर केले.
या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.
याशिवाय दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
दिल्लीतील राणी झांशी रोडवरील अनाज मंडीजवळ एका कारखान्याला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा