डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६४ वा महापरिनिर्वाण दिन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६४ वा महापरिनिर्वाण दिन.त्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही संबोधले जाते. आज आपल्या राज्यघटना ही जगातली सर्वात सु दर अशी राज्यघटना असल्याचे संबोधले जाते. आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिनवादन….आजच्या त्यांच्या विषयी थोडेसे…बाबासाहेबांनी तब्बल ३२पदव्या संपादित केल्या होत्या. त्यात यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.

आंबेडकरांनी इंग्रजीमधून लिहिलेले महत्वाचे ग्रंथ:
Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957).

डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे: मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१०२७), समता (१९२८), जनता (१०३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).

महत्वाचे सत्याग्रह/ आंदोलने: महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२०मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.

बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/ संघटना : बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल (१९२७), स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६), शेड्युल कास्ट फेडरेशन (१९४२), पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५), भारतीय बौद्ध महासभा (१९५५).

गाजलेल्या घोषणा :
● ‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’.
● ‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत.’
● ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.’
● ‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो.’
‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे.’

बाबासाहेबांना १९५५ साली मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान.१०९९ मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.

बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते. याशिवाय त्यांनी बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती.
‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेमध्ये प्रामुख्याने घेतले जाते. बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.
‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.
स्वातंत्र, समता व बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.

दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यामध्ये बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन व विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती. ‘दामोदर नदी खोरे’ व ‘सोने नदी खोरे’ प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या ‘हिराकुड धरण’ प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत व लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता. ‘जय भीम’ या घोषणेनंतर देशात ‘जय हिंद’ ही घोषणा सुरु झाली.
भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.
पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ व पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १९ निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख व परीक्षणं एवढे मोठे लिखाण डॉ. आंबेडकर यांनी केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा