लॉकडाऊनच्या काळात राज्यात १,०४,४४९ गुन्हे दाखल

मुंबई, दि. १३ मे २०२०: मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत गृह मंत्र्यांनी माहिती दिली आहे. राज्यात कलम १८८ लागू करण्यात आला आहे. त्या नुसार १,०४,४४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात १९,८३८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या १२९१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यातील ५६,४७३ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ९७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ल्याच्या २१२ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यातील ७५० आरोपींना अटक करण्यात आली आहे. १०० वर आलेल्या ८९ हजार ७३८ कॉल्सची योग्य दखल घेण्यात आली असून त्यावर कारवाई करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत ३,३९,६४० पास वितरित करण्यात आले आहे. राज्यातील क्वारंटाईन व्यक्तींची एकूण संख्या २,६३,४९३ इतकी आहे. त्यातील क्वारंटाईन शिक्का असलेल्या ६६७ व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. राज्यात ४०१९ रिलिफ कॅम्प बनवण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये जवळपास ३,८८,९४४ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

आतापर्यंत ८ पोलिसांनी गमावला जीव:

कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ९० पोलीस अधिकारी, ७२९ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे. मुंबई ५, पुणे १, सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा ८ पोलीस वीरांना कोरोना मुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा