खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर झालेल्या हल्याचा जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत तीव्र निषेध…

जालना, २५ जानेवारी २०२४ : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेवर काही भाजपाच्या गुंडांनी हल्ला केल्याबद्दल आज जालना येथे झालेल्या बैठकीत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शिवाय हल्लेखोरांना अटक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार नामदेवराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथील विभागीय बैठकीच्या पूर्व तयारीसाठी आज शासकीय विश्रामगृह, जालना येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील बैठकीत खा.राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर हल्ला करणार्‍यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जालना ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते. बैठकीच्या सुरुवातीला प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर भाजपाच्या काही गुंडानी केलेल्या हल्याचा निषेध प्रस्ताव मांडला यास राष्ट्रीय ओबीसीचे समन्वयक राजेंद्र राख यांनी अनुमोदन दिले हा प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर करण्यात येऊन निषेधाच्या घोषणा बैठकीत दुमदुमल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा