एक अजब कारभार, बीडमधील ३८ गावांचा वीज पुरवठा पाच दिवसांपासून खंडित

बीड, १४ नोव्हेंबर २०२२: गेल्या पाच दिवसांपासून बीडच्या आष्टी तालुक्यातील ३८ गावांचा वीज पुरवठा महावितरणनं खंडीत केलाय. यामुळं शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी आष्टी तालुक्यातील अमिया टाकळी येथील गावात असणाऱ्या विद्युत सबस्टेशन मध्ये घूसुन ताबा घेत आंदोलन केलं.

विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करण्याची मागणी करत शेतकरी आक्रमक झालेत. यावेळी महावितरण आधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचरण केले असून शेतकरी संतप्त झाले आहेत. यंदा पाऊस भरपुर प्रमाणात झाल्यानं पाणीसाठा शिल्लक आहे.

मात्र हे पाणी शेतीला देता येत नसल्यानं पिकं पाण्याअभावी जळून चालली आहेत. तसंच गावात लाईट नसल्यानं चोरीचे प्रकार वाढले आहे. यामुळं तात्काळ विद्युत पुरवठा सूरु करावा अन्यथा इथून उठणार नाही; असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतलाय आणि महावितरणला सांगितलं असून आता काय निर्णय घेण्यात येईल याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा