पुंछमध्ये चकमक, सुरक्षा दलांनी ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले

जम्मू-काश्मीर, १८ जुलै २०२३: जम्मू-काश्मीरमधून मिळालेल्या माहितीनुसार, पुंछ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला तोंड देताना सुरक्षा दलांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ही चकमक अजूनही सुरू आहे. रात्री उशिरापासून ही चकमक सुरू आहे. या संदर्भात भारतीय लष्कराने सांगितले की, पुंछमधील सिंधरा भागात सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांना ठार केले आहे. सुरक्षा दलांमधील पहिली चकमक काल रात्री ११:३० च्या सुमारास झाली. ज्यानंतर टेहळणी उपकरणांसह ड्रोन तैनात करण्यात आले.

लष्कराच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार होऊन आज सकाळी पुन्हा चकमक सुरू झाली. भारतीय लष्कराचे विशेष दल, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे कर्मचारी इतर दलांसह या मोहिमेचा भाग होते. या कारवाईत ठार झालेले अतिरेकी बहुधा परदेशी दहशतवादी असून त्यांची ओळखही पडताळून पाहिली जात आहे.

विशेष म्हणजे गेल्या २३ जून रोजीही जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून येथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते, त्यानंतर संयुक्त कारवाईदरम्यान दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा