परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शांत राहावे ; शशी थरूर यांचा सल्ला

नवी दिल्ली, ३ मोर्च २०२३: पाश्चिमात्य देशांकडून येणाऱ्या टिप्पण्या सामान्य पद्धतीने घेणे मला खूप महत्त्वाचे वाटते. जर आपण प्रत्येक टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली, तर आपण स्वतःचे नुकसान करत आहोत. मी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना थोडे शांत राहण्याची विनंती करतो, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना सल्ला दिला.

रविवारी बंगळूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले होते की, ‘पाश्चिमात्य भारतावर भाष्य का करताना दिसतो याची काही कारणे आहेत. पाश्चिमात्य लोकांना इतरांवर भाष्य करण्याची वाईट सवय आहे. त्यांना असे वाटते की हा एक प्रकारचा देवाने दिलेला अधिकार आहे. यापुढेही ते असेच करत राहिले तर इतर लोकही प्रतिक्रिया देतील. आणि ते त्यांना आवडणार नाही.

यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी राहुल गांधीवर निशाणा साधताना म्हटले होते की, तुम्ही लोकांना तुमच्यावर बोलण्यासाठी आमंत्रित करत आहात. मग अधिकाधिक लोक कमेंट करु इच्छितात. आपल्या देशात समस्या आहेत असे सांगून जगाला उदार आमंत्रणे देणे थांबवले पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा