अखेर दहा महिन्यांनंतर मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला सुरवात

रत्नागिरी, २४ नोव्हेंबर २०२२ : गेले दहा महिने रखडलेल्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला सुरवात झाली आहे. पत्तन विभागाने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर ठेकेदाराने कामाचा मुहूर्त शोधला आहे. वर्षभरात मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा पत्तन विभागाला आहे.

२६ डिसेंबर २०११ रोजी मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काहीच काम झाले नाही, ठेकेदाराने केवळ दगड आणून किनाऱ्यावर टाकले होते. १० महिन्यांमध्ये मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काहीच काम न झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू होण्याकरिता पत्तन विभाग सातत्याने पाठपुरावा करीत होता. त्यानंतर पत्तन विभागाने ठेकेदार कंपनीत डी.व्ही.पी.इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. कंपनीला १८ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडात्मक कारवाई करूनही ठेकेदाराने काम सुरू केले नाही. त्यामुळे पुन्हा १८ लाखांचा दंड ठेकेदार कंपनीला ठोठावण्यात आला. एकूण ३६ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर ठेकेदाराला जाग आली. नोव्हेंबर महिन्यापासून ठेकेदाराने मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला सुरवात केली आहे. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे अत्यावश्यक आहे. दरवर्षी पावसामुळे समुद्राचे पाणी मिऱ्या परिसरातील घरांमध्ये शिरते. त्यामुळे मिऱ्या परिसरातील घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू होणे गरजेचे आहे. सुमारे १६० कोटी रुपयांचा निधी मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी मंजूर झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा