जळगाव जिल्ह्यातील पाडळसरे धरण प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी तरुणाने गुडघ्यावर चालत जाऊन श्री.मंगळग्रह देवाला घातले साकडे

चोपडा, जळगाव १९ नोव्हेंबर २०२३ : जळगाव जिल्ह्यातील महत्वाचा असणारा तसेच अमळनेर आणि चोपडा तालुक्यासाठी वरदान समजला जाणारा पाडळसरे धरण प्रकल्प हा सरकारी अनास्थेमुळे अपूर्ण आहे. हे धरण २० ते २५ वर्षापासून पुरेसा निधी अभावी रखडले आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील रहिवासी तसेच पाडळसरे धरण जनआंदोलन समिती सदस्य उर्वेश साळुंखे याने, जगप्रसिद्ध मंदिर अमळनेर येथे गुडघ्यावर चालत जाऊन श्री.मंगळग्रह देवाला धरण पूर्ण होण्यासाठी साकडे घातले.

याआधी उर्वेश साळुंखे यानी निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण पूर्ण करावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या स्वताच्या रक्ताच्या शाईने निवेदन तयार केले आहे. हे रक्ताच्या शाईचे निवेदन उर्वेश साळुंखे मुख्यमंत्र्यांनाच देणार आहे. या साठी उर्वेश साळुंखे सतत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधत आहे. परंतु त्याला अद्याप भेटीची वेळ मिळालेली नाही. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, चोपड्याचे आमदार लता सोनवणे यांना देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विनंती अर्ज दिला आहे. परंतु अद्याप कोणीही भेट घालून दिली नाही.

आज अमळनेर येथे पाडळसरे धरण संदर्भात मंगळग्रह मंदिर येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना उर्वेश साळुंखे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट करून द्या, यासाठी हात- पाय जोडून विनंती केली. या प्रसंगी माजी आमदार साहेबराव पाटील, स्मिता पाटील व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : आत्माराम पाटील

2 प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा