पुढील तीन ते चार दिवस ओडिशा, प. बंगाळ, बिहार, आंध्रप्रदेश या राज्यात उष्णतेची लाट येण्याचा हवामान खात्याचा इशारा

नवी दिल्ली, १३ एप्रिल २०२३: ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याच्या वतीने आज देण्यात आला. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात सरासरीच्या तुलनेत तापमान जास्त राहील, असे हवामान खात्याकडून चालू महिन्याच्या सुरुवातीला सांगण्यात आले होते.

प. बंगालमध्ये १७ तारखेपर्यंत, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर सागर किनारपट्टीच्या भागात १५ तारखेपर्यंत तर बिहारमध्ये १५ ते १७ तारखेदरम्यान उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य भारतातले तापमान सध्या ४० ते ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

पश्चिम हिमालयीन क्षेत्र, ईशान्य भारत, प. बंगाळ, सिक्कीम, ओडिशा, आंध्राचा किनारपट्टीचा भाग तसेच केरळ या ठिकाणी सध्या सरासरीच्या तुलनेत तापमान ३ ते ५ अंशांनी जास्त आहे. मैदानी भागात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले तर ती उष्णतेची लाट जाहीर केली जाते. किनारपट्टीच्या भागात हेच प्रमाण ३७ अंश आणि पहाडी भागात ३० अंश सेल्सिअस इतके आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा