ओबीसी आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर; सुप्रीम कोर्टाचे आदेश, विशेष खंडपीठ गठीत करणार

मुंबई, २२ ऑगस्ट २०२२: राज्यातील ९२ नगर परिषदा, ४ नगरपंचायती आणि २७१ ग्रामपंचायत निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायाल्यात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे‌. पाच आठवड्यानंतर या प्रकरणी सुनावणी होणार असून तोपर्यत स्थिती जैसे थी ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.

न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण दिले तेव्हा या ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरु झाली होती. त्यामुळे ओबीसी आरक्षण स्थगितच ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला होता.

त्यावर राज्य सरकारने पुन्हा फेरविचार याचिका दाखल करत ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत देखील आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती. यावरच आज सर्वोच्च न्यायाल्यात सुनावणी होणार होती. मात्र, आज या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुनावणी पाच आठवडे पुढे ढकलली. तोपर्यत राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यातील आरक्षण संदर्भात स्थिती जैसे थी ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा