“हेमंत करकरे देशभक्त नाही”, प्रज्ञासिंह ठाकूर यांचं पुन्हा वादग्रस्त विधान

भोपाळ, २६ जून २०२१: भोपाळमधील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शुक्रवारी पुन्हा २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. प्रज्ञा भोपाळच्या टाऊन हॉलमध्ये मिसाबंदी सन्मान सोहळ्यात बोलत होत्या.

प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की, १९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि २००७ मध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. ज्या दिवशी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला मालेगाव स्फोटात अटक करण्यात आलं होतं. मी स्वतः अनुभव घेतलाय, ते पाहिलं आणि ऐकलंय.

आठव्या इयत्तेत शिकवणारे माझे आचार्य जी म्हणाले की, हेमंत करकरे, ज्यांना लोक देशभक्त म्हणतात, तेथील लोक असं म्हणताना थकत नाहीत, पण प्रत्यक्षात जे लोक देशभक्त आहेत ते त्यांना ( हेमंत करकरे) देशभक्त म्हणत नाहीत. भीती निर्माण करण्यासाठी, त्यानं माझे आचार्य आणि शिक्षक ज्यांनी आम्हाला शिकविले त्याची बोटं व हाडं तोडली. असं का झालं? हीच लोकशाही असते का?

यापूयापूर्वीही केलं होतं हेमंत करकरे यांच्यावर वादग्रस्त विधान

प्रज्ञासिंह यांनी यापूर्वीही हेमंत करकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. यापूर्वी साध्वी यांनी दोन वर्षांपूर्वी हेमंत करकरे यांना संन्यासींचा शाप लागला असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा झाली, असं विधान केलं होतं. साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, मी तुरूंगात गेले त्याच्या ४५ दिवसांच्या आतच दहशतवाद्यांनी त्याला ठार मारलं.

मालेगाव स्फोट प्रकरणात आरोपी

२९ सप्टेंबर, २००८ रोजी उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथील मशिदीजवळ मोटारसायकलचा स्फोट होऊन सहा जण ठार झाले. या अपघातात १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. प्रज्ञा ठाकूर यांच्याशिवाय लेफ्टनंट कर्नल पुरोहित, चतुर्वेदी आणि कुलकर्णी, अजय राहीरकर, सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय आणि सुधाकर द्विवेदी यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा