गोल पोस्ट अर्थ उद्योग रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘या’ झाल्या महत्वाच्या घोषणा

रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘या’ झाल्या महत्वाच्या घोषणा

नवी दिल्ली, दि. १५ जुलै २०२०: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) बुधवारी कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्यांनी सांगितले की पुढील वर्षापर्यंत ५ जी तंत्रज्ञान सुरू केले जाऊ शकते. मुकेश अंबानी म्हणाले की, गुगल आणि जिओ मिळून एक ऑपरेटिंग सिस्टम तयार करेल, जी एंट्री लेव्हल ४ जी / ५ जी स्मार्टफोनसाठी असेल. जिओ आणि गूगल मिळून भारत २ जी-मुक्त करेल. अंबानी यांनी हेही सांगितले की सर्च इंजिन कंपनी गुगलने जिओच्या व्यासपीठावर ३३,७३७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स एजीएमला प्रथमच संबोधित केले. कोरोना संकटात रिलायन्स फाऊंडेशनतर्फे करण्यात येत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांनी माहिती दिली. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी सांगितले की, मिशन अन्नसेवाच्या माध्यमातून देशभरातील ५ कोटीहून अधिक गरीब, मजूर आणि आघाडीच्या कामगारांना खाद्य उपलब्ध करुन देण्यात आले.

नीता म्हणाल्या की कोरोना इन्फेक्शन सुरू होताच पीपीई किटचे मोठे संकट निर्माण झाले. यासाठी, अशी उत्पादन सुविधा रेकॉर्ड टाइममध्ये तयार केली गेली, जेणेकरुन दररोज १ लाख पीपीई किट आणि एन ९५ चे मास्क तयार करता येतील. रिलायन्स देशभरात आपत्कालीन सेवेमध्ये गुंतलेल्या वाहनांना मोफत इंधन पुरवतो आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मुकेश अंबानी यांनी ऊर्जा क्षेत्रात कंपनीच्या कामगिरीविषयीही माहिती दिली. मुकेश अंबानी म्हणाले की, बीपीने आपल्या इंधन किरकोळ व्यवसायात गुंतवणूक केली आहे. जिओ-बीपी नावाच्या नवीन ब्रँडमध्ये ही गुंतवणूक करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांनी स्वच्छ उर्जा क्षेत्रातील कामांविषयी सांगितले. ते म्हणाले की, रिलायन्स कार्बन डाय ऑक्साईडचे उपयुक्त उत्पादने आणि रसायनात रूपांतर करण्याशी संबंधित नवीन तंत्रज्ञान वापरण्यास वचनबद्ध आहे.

जिओ मार्ट बद्दल माहिती देताना मुकेश अंबानी म्हणाले की त्याचे पायलट मॉडेल यशस्वीरित्या सुरू झाले आहे. या किराणा प्लॅटफॉर्मची बीटा आवृत्ती २०० शहरांमध्ये प्रारंभ झाली आहे. दैनंदिन ऑर्डरचा आकडा अडीच लाखांच्या पुढे गेला आहे. हे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत.

रिलायन्स रिटेलविषयी माहिती देताना मुकेश अंबानी म्हणाले की, त्यांचा किराणा व्यवसाय वाढविण्याची मुख्य रणनीती म्हणजे शेतकऱ्यांना जोडणे आणि ग्राहकांपर्यंत ताजे उत्पादने पोहचवणे. यामुळे केवळ शेतकर्‍यांच्या उत्पन्नात सुधारणा होणार नाही तर उत्पादकताही वाढेल. मुकेश अंबानी म्हणाले की, जिओ मार्ट व्हॉट्सअ‍ॅपच्या तंत्रज्ञानाने सादर केली जाईल, ही युती भारतातील कोट्यावधी लहान दुकानदारांच्या व्यवसायाशी जोडेल. किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यात ग्राहकांना मदतही मिळणार आहे.

मुकेश अंबानी म्हणाले की भारत ५ जी युगाच्या दारात उभा आहे. ते म्हणाले की, सध्या २ जी फोन वापरणार्‍या ३५ कोटी भारतीयांना स्वस्त स्मार्टफोन देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एजीएममध्ये फेसबुक हेड मार्क झुकरबर्ग आणि गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांचे व्हिडिओ संदेशही दाखवले गेले.

जिओमार्ट सादर करताना ईशा अंबानी म्हणाल्या की हे तंत्रज्ञान सध्याच्या किराणा दुकानांना ४८ तासात सेल्फ स्टोअरमध्ये रूपांतरित करेल. ग्राहक अनुभव देखील पूर्णपणे बदलला जाईल. त्यांनी सांगितले की जिओ मार्ट किराणा दुकानांना केवळ व्यवसाय वाढविण्यातच मदत करणार नाही तर मिळकतही वाढेल. जिओ मीट (JioMeet) बद्दल ईशा अंबानी म्हणाली की हे एक स्वस्त आणि अत्यंत सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप आहे. हे वास्तविक जीवनाची आवश्यकता लक्षात घेऊन तयार केले गेले आहे.

ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांनी नवीन जिओ टीव्ही प्लसचे प्रात्यक्षिक दिले. जिओ टीव्ही प्लस एका अॅपवर नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम, हॉटस्टार आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येईल. याशिवाय हे व्हॉईस सर्चसहसुद्धा सुसज्ज असेल.

जिओने जिओ ग्लास देखील सादर केला. अवघ्या ७५ ग्रॅम वजनाच्या या डिव्हाइसमध्ये मिक्स रियल्टीशी संबंधित सेवा असतील. हे एकाच केबलसह कनेक्ट होईल. यात २५ अॅप्स असतील जे एआर तंत्रज्ञानासह व्हिडिओ मीटिंगमध्ये मदत करतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version