अमरावतीमध्ये परीक्षेवर कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याकडूनच पेपर फोडला गेल्याचा आरोप…

अमरावती, २२ फेब्रुवारी २०२४ : राज्य सरकारमधील विविध विभागांद्वारे शासकीय नोकरभरतीसाठी परीक्षा घेण्यात येत आहेत. बहुतांश भरती परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे.

आज अमरावती येथील सिटीलँड मार्केटमध्ये सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर जलसंधारण अधिकारी गट ब परीक्षेदरम्यान गोंधळ झाल्याचं प्रकरण घडलं आहे. एक अधिकारीच विद्यार्थ्यांना उत्तरं पुरवतं असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सागर डोंगरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा