खंडोबाच्या जेजुरीत भाजपा कार्यकर्त्यांनी घातला सरकार विरोधात जागरण गोंधळ

पुरंदर, १३ ऑक्टोबर २०२०: बंद मंदिरे उघडा अन्यथा कायद्यांचा भंग करीत मंदिरे उघडली जातील असा इशारा भाजपाने जेजुरी येथे अंदोलनादरम्यान राज्य सरकारला दिला आहे. तर “बंद केली मंदिरे.. उघडले गेले बार.. उद्धवा अजब तुजे सरकार” असा नारा देत जेजुरी येथे भाजपच्यावतीने आज तळीभंडारा करण्यात आला.

राज्यातील मंदिरे बंद असल्याने सर्वसामान्य लोकांची उपासमार होत असल्याकारणाने शासनाच्या मंदिर बंद ठेण्याच्या धोरण विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत चक्क खंडोबाच्या जेजुरीत सरकार विरोधात जागरण गोंधळ घालत शंख नादही केला. सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा जिल्हाअध्यक्ष तात्या भेगडे, पुरंदर तालुका कार्याध्यक्ष निलेश जगताप, जिल्हा भाजपा नेते जालिंदर कामथे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, सागर भूमकर, मैनाताई जाधव, साकेत जगताप, सचिन पेशवे, गणेश भोसले, सुनिता कसबे, अलका शिंदे, अँड सरला तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य शासनाने केवळ स्वता:चा स्वार्थ पहिला असून सर्व सामान्य लोकांच्या जीवनाचा खेळ खंडोबा केला असल्याचा आरोप करत तात्या भेगडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कडाडून टीका केली. तर शासनाने मंदिरे उघडली नाहीतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यात कायद्याचे उल्लंघन करीत सर्व मंदिरे उघडतील असा ईशार ही त्यांना उद्धव सरकारला दिला.

या आंदोलनात खंडोबा देवाचे मानकरी असलेल्या वाघ्या, मुरळी यांनी सहभाग घेत सरकारला जाग यावी म्हणून संभळ खंजिरी तूनतुने अशी वाद्य वाजवीत शासनाचा विरोध केला. तर देशातील मथुरा काशी अक्षरधाम तिरुपती सारखी मंदिरे उघडली आहेत तर मग महाराष्ट्र राज्यातील मंदिरे बंद का? असा सवाल करीत शासनाने सुरक्षित अंतर आणि योग्य काळजी घेत मंदिरे उघडली पाहिजेत अन्यथा भाजपा सर्वसामन्य लोकांना करिता आक्रमक भूमिका घेतल्या शिवाय राहणार नसल्याचे निलेश जगताप यांनी सांगितले.

काही ही असो भाजप पक्षाचे हे दुसरे आंदोलन असून अनेक संघटना पक्ष्यांनी जेजुरीच्या दरबारात मंदिर उघडण्याकरिता आंदोलने केली आहेत. परंतु अद्यापही सरकारने मंदिरं उघडण्यासाठी परवानगी दिली नाही.

न्यूज अनकट प्रतीनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा