गोल पोस्ट राष्ट्रीय डिसएंगेजमेंटवर भारत आणि चीनचे एकमत…!

डिसएंगेजमेंटवर भारत आणि चीनचे एकमत…!

नवी दिल्ली, १२ सप्टेंबर २०२०: चीनबरोबरच्या सीमा विवादात वाटाघाटी सुरू आहे. आता चीनशी बर्‍याच आघाड्यांवर चर्चा सुरू आहे. लष्करी स्तराव्यतिरिक्त, दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांच्यात गुरुवारी नुकतीच बैठक झाली. चीन एका बाजूला चर्चा करण्यात भारताला व्यस्त ठेवत आहे तर दुसऱ्या बाजूला सीमेवर सैनिकांची जमवाजमव देखील करत आहे. त्याच वेळी, सरकारी स्त्रोतांकडून अशी माहिती समोर येत आहे की दोन्ही देशांच्या राजकारण्यांच्या या बैठकीनंतर डिसएंगेजमेंटचे पाऊल उचलले जाऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलीकडेच दोन देशांच्या राजकारण्यांमध्ये झालेल्या बैठकीत डिसएंगेजमेंटच्या मुद्यावर भारत आणि चीनने सहमती दर्शविली आहे. आता सैन्य कमांडर सुरक्षा दलांच्या डिसएंगेजमेंट बद्दल चर्चा करतील. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सध्या दोन्ही सैन्यांमध्ये सीमेवर अंतर असणे आवश्यक आहे जे सध्या दिसत नाही. सैन्यांमध्ये होणारे वाद टाळण्यासाठी हा एक उपाय आहे. एकदा डिसेंजेजमेंट पूर्ण झाल्यावर ते डिएस्कलेशन आणि सैन्य कमी करण्याच्या दुसर्‍या टप्प्यात जाऊ शकतात.

सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही एक महत्त्वाची पहिली पायरी आहे. राजकारण्यांमधील बैठकीचाच असा परिणाम आहे की, डिसएंगेजमेंट साठी राजकीय मार्गदर्शन केले गेले आहे. यासाठी लष्करी कमांडर्सना आता भेटून घेऊन डिसएंगेजमेंट करण्याबाबत तपशीलवार काम करावे लागेल.

भारत आणि चीन यांच्यात द्विपक्षीय बैठकीसंदर्भात सरकारी सूत्रांनी सांगितले की, परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यामधील बैठक ही महत्त्वाची आणि पहिली पायरी होती. ज्यामुळे दोन्ही देशांनी डिसएंगेजमेंट सहमती दर्शविली आहे.दुसरीकडे, भारतीय लष्कराच्या सूत्रांचे म्हणणे आहे की भारतीय सैन्य आणि चीनी सैन्याने चूशूल येथे ब्रिगेड-कमांडर स्तरीय चर्चा केली. सकाळी ११ वाजता बैठक सुरू झाली आणि दुपारी ३ च्या सुमारास संपली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version