राज्य सरकारशी बोलणे सध्या जरा अडचणीचे आहे, पण त्यातून आज उद्या मार्ग निघेल, शरद पवार यांचे विधान

मुंबई, ३१ जुलै २०२३ : उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि शरद पवार एकाच कार्यक्रमात उपस्थित होते.या कार्यक्रमात शरद पवार यांनी वक्तव्य केले आहे. आम्ही तिघांनी ठरवले तर महाराष्ट्रात बदल होईल, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार म्हणाले, राज्य सरकारशी बोलणे सध्या जरा अडचणीचे आहे. पण, त्यातून आज किंवा उद्या काहीतरी मार्ग निघेल. मार्ग निघाला की, राज्य सरकारला मदत करणे भाग पडेल. उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मीसुद्धा आहे. आम्ही तिघांनी ठरवले तर महाराष्ट्रामध्ये बदल होईल. हे विशेष वेगळे सांगायची गरज नाही.असे शरद पवार म्हणाले.

मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरला पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. सहा ऐतिहासिक ग्रंथांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. वि. का. राजवाडे संशोधन मंडळ ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचा हा कार्यक्रम होता. शरद पवार म्हणाले, अतिशय चांगला असा हा कार्यक्रम आहे. काही पुस्तक वाचली. काही पुस्तक चाळली. ही पुस्तक अभ्यासपूर्ण लिहिली गेलेली आहेत.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी एक जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले, मी राज्याचा प्रमुख होतो. त्यावेळी कर्नाटकता गेलो होतो. तिथे शिवाजी महाराज यांचे बंधू व्यंकोजी यांच्या राज्यात एक प्रशस्त ग्रंथालय होते. त्याठिकाणी मोडी भाषेत शिवाजी महाराज यांच्याबद्दल बरीच पुस्तक लिहिली होती. ते सर्व पाहून राज्यात परत आलो. पाच तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली. त्यांना कर्नाटकातील ग्रंथालयात पाठवले. तिथल्या ग्रंथांचे मराठीत भाषांतर करण्याचे काम दिले होते. त्यामुळे शिवाजी महाराज यांचा इतिहास अधिक समृद्ध करण्यास मदत झाली असल्याचेही शरद पवार यांनी म्हंटले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा