जवानाच्या पत्नीची आत्महत्या

झारखंड : लष्करात जवान असलेल्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचे दु:ख पचवू न शकल्याने पत्नीने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना झारखंड येथे घडली आहे. मनीता उरांव असे महिलेचे नाव असून बजरंग उरांव असे तिच्या पतीचे नाव आहे. याबाबत लष्करकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, झारखंडमधील रांची येथील बहेरा टोली गावात राहणारा बजरंग उरांव लष्करात जवान होता. कश्मीरमध्ये तो तैनात होता. याच दरम्यान, ३० डिसेंबर रोजी उंचावरून पडून त्याचा मृत्यू झाला. पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजल्यापासून मनीता निराश होती. पतीचा मृत्यू झाला आहे. यावर तिचा विश्वास बसत नव्हता. मात्र ज्यावेळी तिरंग्यात पेटलेला बजरंगचा मृतदेह तिने पाहीला तेव्हा ती अस्वस्थ झाली.

पण अंत्यविधी सुरू होताच ती अचानक घराबाहेर धावत गेली व अंगणातील विहीरीत तिने उडी मारली. विहीर खोल असल्याने व पाण्याने भरलेली असल्याने मनीताचा बुडुन मृत्यू झाला. त्यानंतर दोघांवर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा