रेड्डी सरकारकडून विधान परिषद बरखास्त

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत विधान परिषद बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी याबाबत माहिती दिली.

कॅबिनेटच्या बैठकीनंतर आंध्र प्रदेश सरकारचे विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना ३ राजधान्या अस्तित्त्वात आणायच्या आहेत. मात्र त्याबाबतचे विधेयक बहुमताअभावी विधानपरिषदेत रखडले आहे.
यामुळेच वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडूंना धक्का देत, थेट विधानपरिषदच बरखास्तीचा निर्णय घेतला आहे.
माजी मुख्यमंत्री अन् टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडून सरकारच्या या प्रस्तावाचा विरोध करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
रविवारी नायडू यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. ज्यामध्ये पक्षाचे २१ आमदार विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषदेत ५८ सदस्य आहेत. जगन मोहन रेड्डी यांच्या हातात राज्याची सत्ता असली तरी विधान परिषदेत चंद्रबाबू नायडू यांचे बहुमत आहे. या सभागृहात टीडीपीचे २७ तर वायएसआरचे ९ सदस्य आहेत. विधान परिषदेत जगन मोहन रेड्डी यांच्या राज्याच्या ३ राजधान्या या प्रस्तावाला अडकवले गेले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा