मग मी स्वतः राजकारणापासून दूर होईल: गिरीराज सिंह

नवी दिल्ली (वृत्त संस्था):  ” अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आपले काम आता पूर्ण झाले आहे. येथे फक्त लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणापासून दूर होईन,” असे वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे गिरीराज सिंह आज पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी आता राजकारणापासून दूर जाण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. त्यांनी राजकीय निवृत्तीबाबत आपले मत व्यक्त केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शनिवारी ते म्हणाले की, अयोध्येत राम मंदिराची स्थापना करण्याचे माझे काम पूर्ण झाले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा