धाराशिव येथे ओबीसीचा महाएल्गार मेळावा होणार

धाराशिव २३ डिसेंबर २०२३ : राज्यात मराठा समाज ओबीसीतुन आरक्षण मागत आहे. यासाठी अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात रान पेटवले आहे. ओबीसीतुन आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे त्यास ओबीसी समाजाचा अजिबात विरोध नाही, मात्र ओबीसी समाजाचे आरक्षण देऊ नये. ओबीसी समाजामध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी ओबीसींचा महाएल्गार मेळावा धाराशिव जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. त्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.

धाराशिव शहरातील परिमल मंगल कार्यालयात धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मराठा समाजाला सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, प्रत्येक तालुक्यात ओबीसी समाजाच्या बैठक घेण्यासह इतर विविध विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. यावेळी धनंजय शिंगाडे, पांडुरंग कुंभार, कैलास शिंदे, डॉ स्नेहलता सोनकाटे, रज्जाक अत्तार, दिपक जाधव, बाळासाहेब शिंदे, आबासाहेब खोत, उमाकांत लकडे, अक्षय माने आदींसह इतरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन लक्ष्मण माने यांनी तर संतोष भोजने यांनी आभार मानले. या बैठकीत धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी, कळंब, भूम व परंडा या तालुक्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा