सहा वर्षांनंतर महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन १५ दिवसांचे

4

मुंबई, ९ जुलै २०२३: राज्य विधिमंडळाचे १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असून ४ ऑगस्टपर्यंत सभागृहांचे कामकाज चालणार आहे. यावेळी प्रथमच १५ दिवस अधिवेशन चालेल. यापूर्वी २०१७ मध्ये १४ दिवसांचे पावसाळी अधिवेशन झाले होते. त्या अल्पकालीन अधिवेशनाचे रेकॉर्ड यावेळी तुटेल. मागील सहा वर्षांत इतक्या दिवसांचे अधिवेशन झाले नव्हते.

विधिमंडळाची कमी काळाची अधिवेशने झालेली आहेत. कोरोना काळामध्ये २०२० आणि २०२१ मधील पावसाळी अधिवेशन केवळ दोनच दिवस घेण्यात आले. तत्पूर्वी भाजपाच्या सरकारमध्ये २०१८ मध्ये पावसाळी अधिवेशन १३ दिवस, तर २०१९ मध्ये १२ दिवस कामकाज झाले. २०२२ मध्ये म्हणजे शिंदे फडणवीस सरकार असताना पावसाळी अधिवेशनाचे कामकाज केवळ ६ दिवस चालले.

१७ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी पंधरा दिवसांचा निश्चित केला असला तरी आमदारांच्या कोलंटउड्यामुळे सभागृह चालविणे अवघड होण्याची शक्यता आहे. पक्षीय फाटाफुटीमुळे विधिमंडळातील समीकरणे बदलणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या या अधिवेशनापूर्वी, शिंदे गटाच्या सोळा आमदारांवर कारवाई होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष राहील.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा