महाविकास आघाडीचे सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी – हर्षवर्धन पाटील यांचा घाणाघात

5

इंदापूर, १२ ऑक्टोबर २०२०: राज्यातील महाविकास आघाडीचे ‘बिघाडी’ सरकार हे महिलांवरील अत्याचार रोखणे, कोविड रुग्णाना सुविधा, कर्जमाफी योजना, शेती पिकांना नुकसान भरपाई देणे, मराठा आरक्षण आदी सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करून भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तीन पक्षांच्या या महाआघाडी सरकारचा पंचनामा करण्याची वेळ आली आहे,असा घाणाघात सोमवारी (दि.१२) इंदापूर येथे केला.

इंदापूर तहसील कार्यालयावर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा महाविकास आघाडी सरकार व तालुका लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेचा निषेध करणेसाठी आज मोर्चा काढण्यात आला. सदर प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी आघाडी सरकार व इंदापूरच्या लोकप्रतिनिधीवर अनेक उदाहरने देत जोरदार टीकास्त्र सोडले.

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. असे असताना येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आम्हांस न्याय द्या, म्हणून प्रशासनाकडे मोर्चा काढावा लागतो, हे सरकारच्या निष्क्रियतेचे मोठे उदाहरण आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या १५ जून नंतर करू नयेत असा नियम असताना राज्य सरकार हे सध्या बदल्या करून भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

इंदापूर तालुक्यात प्रशासनाचा दोष नाही, दोष हा येथील नेतृत्वाचा आहे. येथील प्रशासनाने निःपक्षपणे वागावे, जनतेला न्याय द्यावा, अन्यथा विरोधी पक्ष म्हणून आम्हांस आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात दिला.

तालुक्यात बांधकाम खात्याचा राज्यमंत्री असूनही रस्त्यांची वाट लागली आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती असतानाही वन खात्याकडून जनतेचे जनजीवन उध्दवस्त करण्याचे काम चालु आहे. इंदापूरात कोरोना रुग्णांना शासन बेडशीट देऊ शकत नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व इतर सुविधा देण्यास लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. नितीन गडकरी यांनी पालखी मार्गासाठी निधी दिला आहे, मात्र गोखळी ते लुमेवाडी दरम्यान जाणूनबुजून भरपाई संदर्भात नोटीस देण्यात विलंब लावला जात असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला.

यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष शरद जामदार, मारुती वणवे, तानाजी थोरात, माऊली चवरे, शीतल साबळे, उज्वला घोळवे यांची भाषणे झाली. इंदापूर पंचायत समिती येथून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आला. तेथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी निवेदन स्वीकारले.

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष शकिल सय्यद, मंगेश पाटील, मयूरसिंह पाटील, दिपक जाधव, प्रदीप पाटील, महेंद्र रेडके, दत्तात्रय शिर्के, रघुनाथ राऊत, शेखर पाटील, कैलास कदम, धनंजय पाटील, किरण पाटील, राम आसबे, सचिन आरडे, नानासाहेब गोसावी, शिवाजी तरंगे, आबा शिंगाडे, सुभाष काळे, राजकुमार जठार, पिंटू काळे, सचिन सावंत, अमोल इंगळे, दादा पिसे, अँड.आसिफ बागवान, चाँद पठाण, घनशाम पाटील, गणेश घाडगे व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा