गोल पोस्ट इतर मैंने गाँधी को क्यों मारा

मैंने गाँधी को क्यों मारा

महात्मा गांधींची हत्या म्हटली की नाव आठवते ते नथुराम गोडसे यांचे. त्यांनी केलेल्या हत्येबद्दल आजही अनेक चर्चा आणि वाद सुरु आहेत. १५ डिसेंबर रोजी नथुरामला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

गांधी यांच्या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी नथुराम गोडसे हेच होते. त्यांच्यावरील खटल्याच्या सुनावणीनंतर त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. महात्मा गांधी यांची हत्या झाली तो दिवस होता ३० जानेवारी १९४८. ही हत्या करण्या अगोदर गांधी यांची दोनदा हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

नथुराम गोडसे व त्याच्या साथीदारांपैकी मदनलाल पाहवाने गांधींच्या प्रार्थना सभेत जानेवारी १९४८ मध्ये बॉम्ब टाकला होता. परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर ३०जानेवारी १९४८ रोजी दिल्ली येथील बिर्ला भवनात गांधींच्या प्रार्थना सभेत गांधी सभेसाठी जात असताना नथुराम यांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या होत्या. परंतु तोही प्रयत्न फसला होता.

न्यायालयात नथुराम गोडसे यांनी
गांधी हत्येची सांगितलेली कारणे

* जालियनवाला बाग हत्याकांडात झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर यांच्यावर खटला चालवण्यात यावा अशी मागणी जनतेकडून झाली होती. मात्र या मागणीला गांधी यांनी समर्थन दिले नाही.

* तसेच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना दिलेल्या फाशीत गांधीने हस्तक्षेप न केल्यामुळे या तरुण देशभक्तांचे प्राण गेले.

* ६ मे १९४६ ला समाजवादीच्या संमेलनात गांधीने मुस्लीम लीगच्या हिंसेसमोर जनतेला आहुती देण्याचे आवाहन केले होते.

* गांधींनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट राष्ट्रभक्त म्हटले होते.
हैदराबादच्या निजामाला हैदराबाद हिंदुबहुल असूनही समर्थन दिले होते.

* जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच दिली होती.

* लाहोर काँग्रेसमध्ये सरदार वल्लभभाई पटेल निवडून आले, केवळ गांधींच्या हट्टामुळे हे पद जवाहरलाल नेहरू यांना दिले गेले.

* १९४७ मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीला गांधींनी ऐन वेळेस समर्थन जाहीर केले होते.

* पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याच्या मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला गांधींनी बाध्य केले होते.

* त्यानंतर पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू निर्वासितांनी जेव्हा मशिदीत तात्पुरता आसरा घेतला. तेव्हा गांधीने लहान मुले, महिला, वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर थंडीत रस्त्यावर राहण्यास भाग पाडले.

* शेवटी जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर माझा नम्र अधिकार आहे.

* १५ नोव्हेंबर १९४८ ला गोडसेला पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली.

error: Content is protected !!
Exit mobile version