खरीप विपणन हंगाम २०२०-२१ साठी किमान आधारभूत किंमत प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली, १२ ऑक्टोंबर २०२०: २०२०-२१ या वर्षीचा खरीप विपणन हंगाम सुरु झाला असून, सरकारनं शेतकऱ्यांकडून मागील हंगामाप्रमाणेच किमान आधारभूत किंमतीत खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे.

खरेदी विपणन हंगाम २०२०-२१ साठी तांदूळ खरेदी प्रक्रियेला गती मिळाली असून, काही राज्यांनी खरेदीसाठी मंजुरी दिली असून काही राज्ये त्यात नव्यानं सामील होत आहेत.भारतीय खाद्य महामंडळ (निगम) आणि काही सरकारी मुख्य संस्थांमार्फत १० आँक्टोबर २०२० पर्यंत ३७.९२ लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी झाली असून, ३.२ लाख शेतकऱ्यांकडून ७१५९.३९ कोटी रुपयांच्या तांदळाची किमान आधारभूत किंमतीत खरेदी झाली आहे.

डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरीयाणा, उत्तर प्रदेश, ओदिशा आणि आंध्रप्रदेश या राज्यांनी दिलेल्या खरेदीच्या प्रस्तावांनुसार ३०.७० लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजूरी दिली आहे. या व्यतिरिक्त १.२३ लाख मेट्रिक टन सुक्या खोबऱ्याच्या (बारमाही पीक) खरेदीसाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांनी देखील मंजूरी दिली आहे. तसेच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत डाळी, तेलबिया आणि सुक्या खोबऱ्याच्या खरेदीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मान्यता दिली जाईल, जेणेकरुन या पीकांच्या एफ एक्यू ग्रेडची खरेदी वर्ष २०२०-२१ च्या अधिसूचित किमान आधारभूत किंमतीवर थेट शेतकऱ्यांकडून करता येईल, परंतु राज्यांनी मंजुरी दिलेल्या खरेदी संस्थांमार्फत केंद्रीय नोडल एजन्सी द्वारे राज्य/केंद्रशासित प्रदेशांमधील अधिसूचित काढणीच्या कालावधीत बाजारातील दर एमएसपीच्या खाली असेल तर ते शक्य होईल.

१० आँक्टोबर २०२० पर्यंत सरकारनं नोडल संस्थांमार्फत किमान आधारभूत किंमतीवर आधारीत ३.३३ कोटी रुपयांचा ४५९.६० मेट्रिक टन मूग खरेदी केला असून त्याचा तामिळनाडू आणि हरीयाणा येथील ३२६ शेतकऱ्यांना लाभ झाला. त्याचप्रमाणं ५०८९ मेट्रीक टन सुकं खोबरं ५२.४० कोटी रुपये इतक्या किमान आधारभूत किमतीला खरेदी केले, ज्याचा लाभ कर्नाटक आणि तामिळनाडू मधील ३९६१ शेतकऱ्यांना झाला. उडीद आणि सुकं खोबरं यांच्या बाबतीत मुख्य उत्पादक राज्यातील दर किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत. मूग व इतर खरीप कडधान्ये आणि तेलबिया यांच्या संदर्भात बाजारात येण्याच्या तारखेच्या आधारे संबंधित राज्यांनी ठरविलेल्या तारखेपासून संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेशात निश्चित तारखेला प्रारंभ करण्याकरिता सरकारआवश्यक व्यवस्था करीत आहेत.

२०२०-२१ खरीप विपणन हंगामासाठी १ ऑक्टोबरपासूनच कापूस खरेदी प्रक्रिया सुरु झाली आहे आणि १० ऑक्टोबर २०२० पर्यंत कापूस महासंघाकडून एकूण २४,८६३ गाठी कापूस किमान आधारभूत किंमतीत ७५४५ लाख रुपयांना खरेदी केला आहे, ज्याचा ५२५२ शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा