श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयास अभाविपचे निवेदन.

उस्मानाबाद, १८ ऑगस्ट २०२०: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, तुळजापूर शाखेच्या वतीने श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्या पूर्ण करण्यासाठी आज दिनांक १८ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले.

या निवेदनाद्वारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले. चालू शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मधील प्रवेश शुल्क ३०% सरसकट कमी करावी आणि फी च्या किमान १०% रकमेवर चालू शैक्षणिक वर्षाला विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. कोरोनाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क ३ टप्प्या ऐवजी ५ टप्प्यात भरण्याची मुभा देण्यात यावी. मागील सत्रातील १५ मार्च २०२० पासून लायब्ररी शुल्क, जिमखाना शुल्क, हॉस्टेलचे शुल्क व सोशल गैदरिंग शुल्क या सर्व फी व इतर फी, तसेच डेव्हलपमेंट फी विद्यार्थ्यांना परत देण्यात यावी. जो पर्यंत महाविद्यालय सुरू होत नाही, तो पर्यंत विद्यार्थ्यांकडून ही फी घेऊ नये.

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांना अद्यापही मिळाली नाही.यामुळे विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन त्यांची शिष्यवृत्ती त्यांना लवकरात लवकर मिळवून द्यावी. सध्या महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ATM ची सुविधा करण्यात यावी. अशाप्रकारची मुद्दे मांडून यावर लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात यावा आणि वरील सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात, असे या निवेदनात नमूद केलेले आहे.

निवेदन देते वेळी, प्रदेश सहमंत्री अंकिता पवार, जिल्हा महाविद्यालय प्रमुख ऋषिकेश साळुंके ,शहर मंत्री पृथ्वीराज महामुनी, शिवांजली बोधले ,अथर्व पाटील ,राज भोरे, प्रतिक अंबुरे, ओमकार पवार ,पृथ्वीराज पाटील,सुरज कावरे, व ईतर विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा