Benefits of natural healing over modern medicine: Nature cures, not Physician;
हिपोक्रेटीसचे हे वाक्य वैद्यकीय क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान असलेल्या आजच्या पिढीमध्ये कितपत लागू होते ? अजिबातच लागू होत नाही असा विचार केला तर ते पूर्णपणे चुकीच ठरेल, कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आजार वाढत आहेत. वाढत्या आजारांवर नवीन आधुनिक उपचार देखील वाढत आहेत. पण तरीसुद्धा, शरीराची नैसर्गिक उपचारशक्ती आजही आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.
भारतात नैसर्गिक उपचाराचा वापर हा प्राचीन काळापासून केला जात आहे. उदा. आयुर्वेद, रेकी, निसर्गोपचार
(naturopathy) आणि इतर. खरंच या वाढत्या आधुनिक वैद्यकीय पद्धतीमुळे आजार मुळापासून बरा होतो का?
खरंतर नैसर्गिक उपचारामध्ये आपले बरेच रोग मुळापासून बरे करण्याची क्षमता आहे आणि काही दुष्परिणाम देखील होत नाहीत. औषधे घेताना त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात, जे औषधाच्या प्रकारावर आणि व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असतात. जर आपण डोके दुखी, पोट दुखी, चक्कर येणे या वर औषधे घेतली तर बऱ्याचदा त्याचे दुष्परिणाम देखील होतात.
नैसर्गिक उपचार हे आधुनिक वैद्यकीय उपचारापेक्षा सहज उपलब्ध आणि परवडणारे असतात. नैसर्गिक उपचार हे निरोगी जीवनशैली वाटचाल करण्यासाठी मदत करतात.निरोगी जीवन जगणे म्हणजे केवळ आजारी नसणे नाही तर एकूणच आपल्या आरोग्याची काळजी घेणे. निरोगी जीवन जगणे ही एक कला आहे. या कलेत शरीर, मन आणि आत्मा या तिघांचा समतोल साधून आनंदी आणि निरोगी जीवन जगणे समाविष्ट आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणे गरजेचे असते तसेच योग आणि व्यायाम यावर जास्त भर दिला पाहिजे. कारण आजची जीवनशैली ही दीर्घकालीन आजारांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे; पण नैसर्गिक उपचाराचा तोटा येवढाच की तो आजार बरा होण्यास आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानापेक्षा जास्त वेळ घेतो. म्हणून बरेच जण नैसर्गिक उपचाराकडे दुर्लक्ष करतात. आपण निसर्गाची मदत आपली जीवनशैली सुधारण्या करता घेऊ शकतो आणि बरेच गंभीर आजार होण्यापासून टाळू शकतो.
नैसर्गिक उपचारांचे फायदे-
१) दुष्परिणाम नसतात आणि दीर्घकालीन फायदे होतात.
२) शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींची काळजी घेतली जाते.
३)प्रतिबंधात्मक उपायांवर भर असतो, म्हणजे आजार होऊच नये असा दृष्टिकोन.
निसर्ग उपचाराचे एक उदाहरण…
सध्या पुण्यामध्ये कात्रज येथील एका उद्यानात दर रविवारी “निसर्ग संवाद” नावाचा उपक्रम सुरू झाला आहे. यात लोकांना झाडांमध्ये फिरायला, शांतपणे बसायला आणि निसर्गाशी जोडले जायला शिकवलं जातं. डॉ. स्मिता पाटील, ज्या या उपक्रमाच्या संयोजक आहेत अस सांगतात की “निसर्गात वेळ घालवल्याने तणाव कमी होतो, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि झोप चांगली लागते. औषधांपेक्षा हे स्वस्त आणि सुरक्षित आहे.” गेल्या महिन्यात या उपक्रमात ५० लोक सहभागी झाले होते, त्यापैकी अनेकांनी सांगितलं की त्यांना औषधांवर अवलंबून राहण्याची गरज कमी झालेली आहे.
हिपोक्रेटीसचे “Nature cures, not the physician” हे वाक्य आजच्या युगात संपूर्णपणे कालबाह्य झालेले नाही. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी शरीराची नैसर्गिक उपचारशक्ती ही कोणत्याही उपचारपद्धतीची मूळ आधारशिला आहे. डॉक्टर आणि तंत्रज्ञान हे त्या शक्तीला मदत करणारे हात आहेत.