नवज्योतसिंग सिद्धू यांचा राजीनामा, काय आहेत नाराजीची कारणं?

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2021: पंजाबमधील राजकीय गोंधळ अजून संपण्याचे नाव घेत नाही आहे. आता नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. सोनिया गांधींना दिलेल्या राजीनामा पत्रात नवज्योतसिंग सिद्धू यांनी लिहिले आहे की, त्यांना पंजाबच्या भविष्याशी तडजोड करायची नाही. सिद्धू यांनी आपल्या राजीनाम्याची खरी कारणं पत्रात लिहिलेली नाहीत, परंतु सूत्रांनुसार, त्यांचं नवीन मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याशी जुळत नव्हतं आणि सिद्धू त्यांच्या काही निर्णयांवर खुश नव्हते.

सोनिया यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात नवज्योतसिंग सिद्धू यांनी लिहिलं, ‘एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य तडजोड करून संपतं. मी पंजाबच्या भविष्याशी तडजोड करू शकत नाही. म्हणूनच मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेससाठी काम करत राहीन.

सिद्धू यांच्या नाराजीचं कारण काय?

1. मंत्रिमंडळात ज्या प्रकारे पोर्टफोलिओचं वितरण करण्यात आलं त्यावर नवज्योतसिंग सिद्धू खूश नव्हते. कुलजित नागरा यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्यानं सिद्धू देखील संतापले होते.

2. नवीन मंत्रिमंडळात सुखविंदर सिंग रंधावा यांना गृहमंत्री बनवण्यात आलं आहे, तर नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना विरोध सुरूच ठेवला.

3. अमृतसर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे चरणजीत सिंग चन्नी यांनी दिलेलं पत्र. सिद्धू यांना ते सोपवायचं होतं.

4. सिद्धू काही अधिकाऱ्यांच्या बदलीवरही खूश नव्हते.

सिद्धू यांच्या राजीनाम्यामागं ही कारणे असू शकतात

अॅडव्होकेट जनरल (एजी) च्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि नवज्योत सिंग सिद्धू कोणत्याही एका नावावर सहमत होऊ शकले नाहीत. सिद्धू यांची इच्छा होती की सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुलदीप सिंह यांचे पुत्र डी एस पटवालिया यांची या पदावर नियुक्ती व्हावी आणि ते जवळजवळ अंतिम होतं, परंतु सीएम चन्नी यांच्या आग्रहानंतर बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अनमोल रतन सिद्धू यांचं नाव समोर आलं. मात्र, हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर अमरप्रीत सिंह देओल यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली.

अॅडव्होकेट जनरलच्या नियुक्तीमध्ये चरणजीत सिंह चन्नी यांचं सरकार प्रश्नांमध्ये अडकले आहे. चन्नी सरकारने गुरु ग्रंथ साहिबच्या अपमानानंतर कोटकपुरा शूटिंग प्रकरणात आरोपीचे वकील अमरप्रीत सिंह देओल यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली होती, ज्याबद्दल सिद्धू संतप्त होते. तथापि, देओलने स्पष्टीकरण दिले होते की त्यांचा अपमान प्रकरणाशी काहीही संबंध नाही. कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित कोटकपुरा गोळीबारात ते फक्त एका पोलीस अधिकाऱ्याचे वकील राहिले आहेत, जो आता निकाली निघाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा