गोल पोस्ट राष्ट्रीय नेपाळ ने भारतवर या बाबतीत आणली “बंदी”, भारतावर होतीय जोरदार टिका….

नेपाळ ने भारतवर या बाबतीत आणली “बंदी”, भारतावर होतीय जोरदार टिका….

काठमांडू, दि. १० जुलै २०२०: भारतातील वृत्तांकन करणाऱ्या सर्व न्यूज चॅनल्स वर नेपाळ मधे बंदी आणली आहे. भरातीय न्यूज मिडिया हि फार कशाचाही आधार न घेता गोष्टींचा पाठपुरवा न करता बातम्या देत आहेत आसा आरोप नेपाळ मधील काही नेते मंडळीनीं केला आहे. तर आता नेपाळ मधे भारताती फक्त दुरदर्शन हि वाहिनी फक्त प्रसारित होत आहे.

नेपाळ मधे आधिकृत रित्या भारतीय मिडिया वर बंदी घातली गेली नाही ये तर त्या देशातील केबल ऑपरेर्टस ने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान सरकारने कोणताही आदेश दिलेला नाही मात्र आम्ही भारतीय न्यूज चॅनल्स दाखवणं बंद करतो आहोत असं नेपाळमधील केबल ऑपरेर्टस नी ANI या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

तसेच भारतीय न्यूज चॅनल्सनीं बिना आधार तेथील सरकार बद्दल व नेपळाचे पंतप्रधान के.पी.शर्मा बद्दल वृत्तांकन करताना आपली सर्व पातळी व मर्यदा ओलांडल्या आसल्याचे विधान सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायण काजी यांनी केले. तर त्यांनी यांचा कडा विरोध ही नोंदविला.

त्या बरोबर नेपाळ मधील अनेक नागरिक हे सरकार वर जरी नराज असले तरी भारतातील न्यूज चॅनल्स बद्दल त्यांच्या मधे अक्रोश व संतापाची लाट पाहायला मिळत आहे. ज्या मधे नेपाळचे नागरिकच नाही तर नेपाळ मधील राजकीय नेते देखील सामील आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version