गोल पोस्ट राजकारण खून केलेल्या आरोपीला 10 वेळा नाश्ता, जणू सासरवडीतच आहे, ओवेसींचे आशिष मिश्रावर...

खून केलेल्या आरोपीला 10 वेळा नाश्ता, जणू सासरवडीतच आहे, ओवेसींचे आशिष मिश्रावर वक्तव्य

लखीमपूर, 11 ऑक्टोंबर 2021: हैदराबादचे खासदार आणि अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यूपीच्या लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराबद्दल वक्तव्य करत म्हणाली की, झालेला हा हिंसाचार केवळ एक घटना म्हणता येणार नाही, वरतून परवानगी भेटल्याशिवाय या गोष्टी झालेल्या नाही.
ओवेसी म्हणाले, ‘लखीमपूरला केवळ एक घटना म्हणू शकत नाही.  वरतून आदेश आल्याशिवाय ही घटना घडलेली नाही.  निष्पाप शीख शेतकरी गाडीखाली चिरडले गेले. ही घटना केवळ एक अपघाती घटना नसून ती नियोजनपूर्वक केली गेली होती.
 ते म्हणाले की ‘हे सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणानंतर घडते आणि पोलिसांना त्यावर कारवाई करण्यास इतका वेळ लागतो.’  आशिष मिश्रा बद्दल ओवेसी म्हणाले, ‘त्याने 12 तासात 10 वेळा नाश्ता केला, असे वाटले की तो त्याच्या सासरच्या घरी गेला आहे.’  भाजप आशिष मिश्रा याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
 लखीमपूर हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला.  या हिंसाचारात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांना 45-45 लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.  यावरही विनोद घेत ओवेसी म्हणाले, ‘या लोकांना लाज वाटली पाहिजे, एखाद्या माणसाचे आयुष्य 45 लाखांचे आहे का?’
 ते म्हणाले की, ‘भाजप आणि पंतप्रधान मोदींना त्यांच्या गर्वातून बाहेर पडावे लागेल.  पंतप्रधान मोदी लखनौला आले आणि त्यांना भेटायला गेले नाहीत.  एक शब्दही बोलला नाही.  अजय मिश्रा तेनी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी केली.  जेव्हा मुलगा आरोपी असतो आणि वडील केंद्रीय मंत्री असतात, तेव्हा न्याय कसा मिळणार?
 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरीच्या टिकुनिया भागात हिंसाचार झाला.  एफआयआरनुसार, आशिष मिश्रा यांनी आंदोलक शेतकऱ्यांना वाहनाने चिरडले आणि गोळीबारही केला.  या हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 8 जण ठार झाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
error: Content is protected !!
Exit mobile version