पाकिस्तानकडून टपाल सेवा पुन्हा सुरू

नवी दिल्ली: पाकिस्तानने भारताबरोबर थांबवलेली टपाल सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पार्सल सेवा आजही बंदच असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान तीन महिने ही सेवा बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. त्यातच आता पाकिस्तानकडून टपाल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने टपाल सेवा बंद केली होती. त्याचवेळी पाकिस्तानने भारताशी दळणवळण व इतर व्यापार संबंधदेखील तोडले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा